नवी दिल्ली, दि.15- वर्षभरापासून जम्मू आणि काश्मीरचं वातावरण ढवळून निघालं आहे. काश्मीरमध्ये अशांतता पसरली आहे. या अशांतते मागे फुटीरतावादी आणि पाकिस्तान असल्याचा दावा केला जात आहे. आता यामागे चीनचाही हात असल्याचा दावा मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. काश्मीरमध्ये ज्या हिंसेच्या घटना घडत आहेत. त्यामागे बाहेरच्या शक्ती आहेत. आता तर चीननेही हस्तक्षेप करायला सुरुवात केली आहे, असा दावा मुफ्ती यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment