शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव मिळावा आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप आज मध्यरात्री अखेर मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेतकरी संघटनेचे नेते यांच्यात तब्बल ४ तास झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेतकरी नेते यांच्यात मध्यरात्री बाराच्या सुमारास बैैठक सुरू झाली. चार तास चाललेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते व मुख्यमंत्र्यांमध्ये समझोता झाला व सरकारने शेतकऱ्यांच्या ७० टक्के मागण्या पूर्ण केल्याने संप मागे घेत असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी मध्यरात्री ४ च्या सुमारास केली. दोन दिवसातील आंदोलनादरम्यान ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचे गुन्हे मागे घेण्यात येतील परंतु जे शेतकऱी नाहीत त्यांचे गुन्हे मात्र मागे घेतले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आंदोलनात ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्या शेतकऱ्याच्या परिवाराला सरकार मदत करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
Interaction with media after the discussion with representatives of farmers pscp.tv/w/bACCTzF3QkVB…

No comments:
Post a Comment