Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, June 13, 2017

दहावीच्या निकालातही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल


पुणे, दि. 13 - राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहिर झाला आहे. दहावीचा एकूण निकाल  ८८.७४ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचे पास होण्याचे प्रमाण ८६.५१ टक्के असून मुलींची टक्केवारी ९१.४६ आहे. राज्य शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली. राज्याच्या निकालाची टक्केवारी घटल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. नापास झालेल्या विद्यार्थींची फेरपरीक्षा 18 जुलैला घेण्यात येणार आहे. 
१७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यामधील 1 लाख 8 हजार 915 विद्यार्थी एटीकेटीमध्ये पास झाले आहेत.  कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. कोकण मध्ये ९६.१८ टक्के विद्यार्था पास झाले आहेत.  90 टेक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थांची संख्या 48 हजार 470 आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना कलचाचणीचा अहवाल व मूळ गुणपत्रिका २४ जून रोजी शाळेत मिळणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहिर केले. 
 
राज्य मंडळाने एकूण ५६ विषयांची परीक्षा घेतली होती. त्यापैकी १० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
राज्यातील २१ हजार ६८४ शाळांमधून १६ लाख ५० हजार ४९९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.
 
 
निकालाची विभागनिहाय आकडेवारी  
 
विभाग         टक्के  
 
पुणे           ९१.९५             
 
नागपूर      ८३.६७                
 
औरंगाबाद   ८८.१५        
 
मुंबई            ९०.०९      
 
कोल्हापूर      ९३.५९          
 
अमरावती     ८४.३५      
 
नाशिक         ८७.७६      
 
लातूर             ८५.२२   
 
कोकण          ९६.१८
 
एकूण।        ८८.७४       
 

No comments:

Post a Comment