Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Sunday, July 30, 2017

जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा


जम्मू-काश्मीर, दि. 30 - सीमेवर सतर्क असलेले जवान सातत्याने पाकिस्तान पृरस्कृत दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावला आहे. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती सुरुच आहेत. पुलवामा जिल्ह्यातील तहाब भागातील चकमकीत सुरक्षा जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. आज सकाळपासूनच दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरु होती. यामध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा डाव उधळून लावत त्यांना यमसदनी पाठवले आहे. या ठिकाणी आणखी दहशतवादी लपून बसले आहेत. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक अद्याप सुरुच आहे. 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील तहाब भागातील एका घरात तळ ठोकून बसले होते. भारतीय लष्कराला माहिती मिळतास त्यांना घेरले. लष्कर आणि दहशतवाद्यांध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये दोन्ही दहशदवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले. पाकिस्तानकडून मागील काही दिवसांपासून नियंत्रण रेषेचं उल्लघंन आणि घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. भारतीय जवान पाकच्या या कृत्याला सडेतोड उत्तर देत आहेत. यामध्ये भारतीय जवानही शहीद होत आहेत.

No comments:

Post a Comment